नुकतीच केंद्र सरकारने सोयामिल आयातीला मंजुरी दिली आहे.तयानंतर शेतकऱ्यांमध्ये असंतोष पसरला.
नेमक सोयामिल म्हणजे काय ? आणि त्याचा भारतीय सोयाबीन मार्केट मध्ये काय परिणाम होणार ? हे आपण सविस्तर पाहू
.सरकारचे आयात धोरण जाहीर झाल्यानंतर समाज माध्यमातून अफवांचा महापूर आला.
आणि भोळ्या भाबड्या शेतकऱ्यांना चिंतेत टाकण्याचं काम केले
त्यातच सोयाबीन बाजारभाव १५०० -. २००० रूपयांनी कोसळला त्यामुळे शेतकऱ्यांना भविष्यात सोयाबीन भाव पडतील अशी भीतीही वाटत आहे.
सगळा प्रकार आपण आज समजून घेणार आहोत.
सोयामिल म्हणजे काय ?
सोयाबीन म्हणजे प्रोटीन चे भांडार.सोयामिल हे सोयाबिन पासून तेल काढल्यानंतर राहीलेला भाग होय.म्हणजे चोथा ! नाव सोयमिल आहे पण तो चोथाच पण पौष्टिक, त्या मध्ये प्रोटीन चे भांडार असते .ते वेगळ्या वेगळ्या प्रकारची असतात द्रव रुपात , घन रुपात, उदा - सोयाबीन चंक ( सांडगा).सोयाबीन चे तेल काढल्यानंतर क्षिललक पदार्थ म्हणजे 'सोयामिल '
उपयोग कोठे होतो.
- सोयाबीन पासून तेल काढल्यानंतर क्षिललक पदार्थ म्हणजे सोयामिल होय .
याची सर्वात जास्त गरज पोल्ट्री व्यवसाय,पशूखादय, माशांचे खाद्य यामध्ये असते. प्रोटीन चे प्रमाण जास्त असल्याने पशु खाद्य म्हणून वापरतात.जगात चीन,भारत, अमेरिका या देशांमध्ये याची खुप मागणी आहे.
सोयामिल आयातीला मंजुरी का दिली.?
भारतामध्ये पण सोया मिलची निर्मीती होते. २०२१ मधे सोयामिलचा तुटवडा निर्माण झाला.
व त्यांच्या किमती मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. त्यामुळे पोल्ट्री व्यवसाय पशूखादय व्यवसायीकांनी सोया मिलची आयात करावी अशी मागणी केली व दरवाढ खाली येईल .
५५० डॉलर प्रति टन या दराने करणार आहेत .
पुढील तीन महिन्यां करीता ही सोयामिल आयात असेल
. .
सोयाबीन बाजारभावावर काय परिणाम होईल?
. - सोयाबीन आणि सोयमिल मधे खुप फरक आहे. त्याचा सोयाबीन मार्केट शी काही संबंध नाही.
सोयमिल तुटवड्यामुळे निर्माण झालेली आर्थिक वाढ थांबवण्यासाठी पोल्ट्री व्यवसाय असोसिएशन ने मागणी केली त्यामुळे सोयामिल आयात केली आहे.
ज्या वेळी शेतकऱ्यांचे सोयाबीन मार्केट मध्ये येईल तोपर्यंत आयात बंद झालेली असेल.
त्याचा मार्केट वर म्हणावा तीतका परिणाम होणार नाही.
शेतकऱ्यांनी चिंता करू नये.
0 टिप्पण्या
if you hav doubt le know